टाकळी हाजी ग्रामसभेत हिंदुत्ववादी ठरावांचा एकमुखी स्वीकार; गावाच्या सामाजिक सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल..!
शिरूर, टाकळी हाजी हाजी गावात आज सकाळी १० वाजता पार पडलेल्या महा ग्रामसभेत, ग्रामशांती, सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक एकात्मतेच्या रक्षणासाठी चार ठळक ठराव एकमुखीने मंजूर करण्यात आले. शेकडो ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत, पोलीस बंदोबस्ताच्या छायेत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणा ही ऐतिहासिक सभा पार पडली.
ग्रामसभेतील या निर्णयांचे गावाच्या भविष्यासाठी मोठे महत्त्व असून, हे सामूहिक निर्धाराचे प्रतीक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामसभेत संमत महत्त्वाचे ठराव पुढीलप्रमाणे –
प्रार्थनास्थळ उभारणीवर नियंत्रण:
ग्रामपंचायतीच्या अधिकृत परवानगीशिवाय गावात कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रार्थनास्थळ उभारणे किंवा त्यामध्ये प्रार्थना भरविणे यास बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधी सर्व धार्मिक उपक्रमांसाठी आता स्थानिक स्वीकृती आवश्यक राहील.
अनधिकृत धर्मांतरविरोधी ठराव:
प्रलोभन देऊन धर्मांतर घडवणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवर तात्काळ कारवाई करून ती स्थळे जमीनदोस्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे गावात धार्मिक सौहार्द व स्थैर्य टिकवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बाहेरील अपप्रचारकांवर गावबंदी:
ग्रामपंचायत क्षेत्राबाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी गावात येऊन कोणत्याही प्रकारचा धार्मिक अपप्रचार केल्यास त्यांच्यावर गावबंदीची कारवाई करण्यात येईल, हा निर्णय ग्रामसभेत मंजूर झाला.
आरक्षणाचा अपवापर रोखण्यासाठी उपाय:
हिंदू धर्मात जन्म घेतलेली व्यक्ती जर इतर धर्मांचे सार्वजनिक प्रार्थनासमयी, प्रचार किंवा अनुयायित्व करताना आढळल्यास, त्यांच्या आरक्षणासह शासकीय योजनांचा लाभ तत्काळ रद्द करण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
ग्रामस्थांची भूमिका – “गाव तितका हिंदुत्वाचा बुरूज”
ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की, हे ठराव कोणत्याही धर्मविरोधासाठी नव्हेत, तर गावातील शांती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आवश्यक आहेत. विविधतेतील एकतेचा आदर्श जपत, गावाच्या सांस्कृतिक रक्षणासाठी हे कठोर पण आवश्यक निर्णय घेतले गेले आहेत.
सामूहिक विचारांचे उदाहरण – इतर गावांसाठी प्रेरणादायी ठराव
ही ग्रामसभा फक्त निर्णय घेणारी सभा नव्हे, तर गावाच्या आत्मसन्मान, परंपरा आणि सामाजिक शिस्तीच्या रक्षणासाठी एक सशक्त उदाहरण ठरली आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णायक भूमिकेचे परिसरात आणि जिल्हाभरातही कौतुक होत आहे.
समारोप – सामाजिक सुरक्षेच्या दिशेने निर्णायक टाकलेले पाऊल
टाकळी हाजी ग्रामसभेतील हे ठराव गावकऱ्यांच्या एकात्मतेचा, जागरूकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा आहेत. गावाने लोकशाही मार्गाने व शांततेने निर्णय घेऊन ग्रामीण भारतात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची दिशा दाखवली आहे.
No comments:
Post a Comment