वृक्ष लागवड काळाची गरज - मारुती बनकर
क्रिस्टल कंपनीकडून हजारो वृक्षाची सातेफळ येथे वाटप.
टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
वृक्ष लागवड ही अंत्यत महत्वाची असून ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मारुती बनकर यांनी सातेफळ येथे केले . जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथे क्रीटल अर्गो कंपनीचे विष्णू बनकर हे निसर्गप्रेमी असून वातावरणाचा ऱ्हास पाहता त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे वृक्ष देण्याचा निर्णय केला अन त्याला सातेफळ येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असल्याचे मारुती बनकर यांनी सांगितले.
सातेफळ येथे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हजारो झाडे वाटप करण्यात आली असून त्या वृक्षाची संगोपन करण्याची जबाबदारी गावातील लहान मोठ्यासह विद्यार्थ्यांनी घेऊन सातेफळ गावाचे नाव जिल्ह्यात मोठे करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष घेऊन जाणे हे महत्त्वाचे नसून हे वृक्ष आपल्या पुढील पिढीसाठी योगदान ठरणार असून आपल्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना वाढवणे ही अति महत्वाचे आहे.कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे .विशेषतः आपण लागवड केलेला वृक्ष कायमस्वरूपी आपली आठवण राहील असे असे ते म्हणाले यावेळी क्रिस्टल ऍग्रो कंपनीचे ,दीपक पिसे,विष्णू बनकर ,ज्ञानेश्वर बनकर, यासह शालेय विद्यार्थीसह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment