पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री देवराई शिरुर येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम... तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शंकुतला बहेनजी यांच्या हस्ते वृक्षारोपण; पर्यावरण रक्षणाचा संकल्प..!
जिल्हा पुणे प्रतिनिधी – अविनाश घोगरे
शिरूर, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री देवराई, शिरूर यांच्या वतीने पुणे–अहिल्यानगर रस्त्यालगतच्या डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिरूरचे तहसीलदार मा. बाळासाहेब म्हस्के व प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शंकुतला बहेनजी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक नेते रवींद्र सानप, ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवक, प्रा. सतीश धुमाळ, प्रा.चंद्रकांत धापटे, सह्याद्री देवराईचे महिबूब सय्यद, आदित्य मैड, राहुल निकुंभ, दिलीप मैड, गोपीनाथ पठारे, रवि लेंडे, माजी प्राचार्य दिलीप देशमुख, अविनाश घोगरे, बाळासाहेब आवारी, माजी शिक्षक अशोक शेळके, कैलास घाडगे, फक्रुद्दीन शेख यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
"निसर्ग रक्षण ही काळाची गरज – मानवालाच पुढाकार घ्यावा लागेल"
कार्यक्रमात बोलताना शंकुतला बहेनजी म्हणाल्या, "पर्यावरणाचा ऱ्हास मानवी चुकीमुळेच झाला आहे. आता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवानेच जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा."
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले की, *"पर्यावरण संरक्षण ही केवळ एक जबाबदारी नसून काळाची गरज आहे. पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला हवामान, पाणी, जमीन यांचे संवर्धन करावे लागेल. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा करावी."
लोकसहभागातून वृक्षलागवड – निसर्ग संवर्धनाचा आदर्श
या उपक्रमाअंतर्गत हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आबा, चिकू, लिंब, गुलाब आदी विविध प्रकारची सुपीक व उपयुक्त झाडे लावण्यात आली. सह्याद्री देवराईच्या कार्यकर्त्यांकडून या झाडांचे नियमितपणे संरक्षण व निगा राखली जाते, ही विशेष बाब आहे.
पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण रक्षणाबाबत महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. "बदलत्या हवामानाच्या आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. निसर्गाशी सुसंवादी जीवनशैली अवलंबूनच पुढील पिढीला सुरक्षित पर्यावरण दिले जाऊ शकते," असे मत सहभागी मान्यवरांनी मांडले.
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शंकुतला बहेनजी यांच्या हस्ते वृक्षारोपण प्रसिद्ध सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती वड, पिंपळ, चिंच, गुलाब आदी वृक्षांची लागवड निसर्ग रक्षणाबाबत जनजागृतीचा स्तुत्य प्रयत्न लोकसहभागातून वृक्षांचे संवर्धन व देखभाल पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन सह्याद्री देवराई शिरूर यांनी घेतलेला हा उपक्रम निसर्ग संरक्षणासाठी जनमानसात जागृती निर्माण करणारा आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारा आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल सर्व शिरूरकरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
No comments:
Post a Comment