नळविहीरा येथे अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने एका एकराच्या कलिंगड बागेवर घातला रोट्या
दोन लाखाचे नुकसान शेतकऱ्याची मदतीची मागणी
टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यात गेल्या हप्त्यात अवकाळी पाऊस, वाऱ्या वादळाने हाहाकार करून कहर केला यात सोलर पंप, शेडनेट यासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नळविहरा येथिल शेतकरी शंकर भिकाजी गाडेकर यांच्या गट नं २३ मधिल एका एकरातील अवघ्या आठ दिवसावर तोडणीला आलेल्या कलिंगडची अख्खा बागेची नासाडी झाली . त्यांनी एप्रिल महिन्यात लावलेल्या साडेचार हजार रोपट्यांना तिन तिन चार चार किलों च्या कलिंगडाचे फळे बहरात येत असतांना अचानक पडलेल्या अवकाळी पाऊस व वादळाने ही फळे सडली,फुटली व झाडापासुन वेगळी झाली यामुळे या शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास अति पावसामुळे हिरावल्या गेल्याने हे शेतकरी कुंटुंब हतबल झाले असुन , यात त्यांचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे . एकतर खरीपाची पेरणी जवळ आल्याने व बि बियाणे खत औषधी यासाठी हातात पैसा नसल्याने आता काय करावे या समस्येने शेतकरी शंकर गाडेकर व कुटुंबातील सदस्य तणावग्रस्त झालेले असून शासनाने पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गाडेकर कुंटुंबीयांनी केली आहे .
रखरखत्या उहाळ्यात लावलेल्या या एका एकरातील कलिंगडाच्या रोपट्यांना हाताने पाणी टाकुन कसेबसे त्यांना जगविले, रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक, विविध प्रकारची खते कीटकनाशके मजुरांचा खर्च असा ७० ते ८० हजार रुपयाचा खर्च झाला आणि अवघ्या दहा-बारा दिवसावर तोडणीला आलेले फळे या अवकाळी पावसाने होत्याची नव्हती केली.त्यामुळे या शेतकऱ्यापुढे विविध समस्या आव पाहून उभे आहे . कारण जवळपास दहा टाळ्यांच्या वर हे कलिंगड झाले असते व त्यातून निश्चितच दोन लाखाच्या वर उत्पन्न निघाले असते मात्र आता संकटात शिवाय दुसरा त्यांच्यापुढे पर्याय उरला नसून शासनाने या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. व आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी शंकर गाडेकर व परिसरातील शेतकरी करीत
आहे .
कृषिमंत्र्यांनी ढेकळांचा पंचनामा न करता आमच्या शेतातील कलिंगड बागेचा झालेला नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश द्यावे गेल्या दोन महिन्यापासून ज्या कलिंगडच्या रोपट्यांना जगविण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य धडपड करीत होते ओंजळीने पाणी टाकून ही रोपटे जगविली होती आणि ऐन मुखाशी घास आला होता मात्र अवकाळी पावसाने हाहाकार केला आणि आमची कलिंगडची बाग होत्याची नव्हती झाली .त्यामुळे केलेली मेहनत वाया गेली आणि परवाच राज्याचे कृषिमंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे म्हटले की उन्हाळ्यात काय ढेकळाचा पंचनामा करायचा का मात्र मंत्री महोदयांना एकच सांगणे आहे येथे ढेकळाचा नाही
तर झालेल्या कलिंगड नुकसानीचा पंचनामा करावा व आम्हाला मदत द्यावी एवढीच कृषिमंत्र्यांना विनंती आहे कारण पुढे खरिपाची पेरणी लागवड करायची आहे. खिशात पैसा नाही , कुणी उसनवारी ही करत नाही, झालेली नुकसान मोठी आहे आणि त्याहूनही समस्यांचा डोंगर पुढे उभा आहे . हाताला काम नाही मजुरी मिळत नाही त्यामुळे शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन न्याय द्यावा एवढीच अपेक्षा .-- शंकर भिकाजी गाडेकर कलिंगड उत्पादक शेतकरी नळविहरा
No comments:
Post a Comment