ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बंधकामा विरोधत ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष "ॲड.विक्रांत चव्हाण" यांचं वर्तकनगर प्रभाग समिती बाहेर आमरण उपोषण



ठाणे प्रतिनिधि अरविंद कोठारी

ठाणे: इमारतीच्या अनधिकृत बांधकामा बाबत ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी वर्तक नगर विभाग समिती समोर आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर वर्तक नगर विभाग समितीने घाईघाईने इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. यावर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले की, संपूर्ण इमारत पाडल्या शिवाय आपण आंदोलना पासून मागे हटणार नाही. गेल्या चार महिन्यांपासून ते अनधिकृत बांधकामा बाबत तक्रार करत आहेत. चार महिन्यांत सहा मजली इमारत बांधण्यात आली. वर्तक नगर विभाग समितीचे सहाय्यक आयुक्त दबावामुळे किंवा काही संगनमताने कोणतीही कारवाई करत नव्हते. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनाही तक्रार देण्यात आली होती. परंतु कोणतीही कारवाई होत नव्हती. असे दिसते की भूमाफियांनी आता ठाणे महानगर पालिकेवर कब्जा केला आहे. दिवा विभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामाची लाट आल्याचे दिसते. मुंब्रा, कळवा, ठाण्यातील कोणत्याही प्रभाग समितीत राहणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी, कचरा, वाहतूक किंवा मुलांचे भविष्य अशा नागरी सुविधांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनधिकृत शाळांमुळे हे प्रकरण गंभीर बनत आहे. ठाणे महानगर पालिकेच्या कोणत्याही विभागात तक्रार करा, पण जनतेची तक्रार ऐकली जात नाही. म्हणून आज जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व पक्ष काम करत आहेत. या उपप्रकल्पात अंजली सिंग, निजाम शेख, विनीती तिवारी, गुलाब धर यादव, निशिकांत कोळी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment