खरीप हंगाम पेरणीच्या अनुषंगाने नांदखेडा येथे कृषी खात्याच्या वतीने मार्गदर्शन मेळावा.
टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथे कृषी विभागांतर्गत माननीय तालुका कृषी अधिकारी श्री अमोल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री निवृत्ती भगत यांनी गावातील खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या पूर्व तयारीची शेतकऱ्यांशी चर्चा करून, पुढील हंगामात घेतले जाणारी काळजी व पिकांचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमांचे शेतकऱ्यांना माहिती दिली. यामध्ये माती परीक्षण करण्याचे महत्त्व व त्यासाठी घेण्यात येणारा नमुन्याची पद्धत समजावून सांगितली बियाण्यास बीजप्रक्रिया करण्याचे महत्त्व सांगितले. त्यासोबत घरचे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले. बियाण्याची उगवण क्षमता कशाप्रकारे करण्यात यावी याविषयी सविस्तर माहिती दिली. शेती पिकामध्ये हुमणी अळीचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन याचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल त्याबाबत कमी खर्चाचे उपाय सुचवण्यात आले या अळीचे भुंगाकिडे लाईट ट्रॅप लावून नष्ट करण्याचे आवाहन केले. तसेच शेतीमध्ये सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवल्याने उत्पादनात कशाप्रकारे वाढ होते याची माहिती दिली .
त्याचबरोबर कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी पोर्टलवरून शेतकरी कशाप्रकारे विविध घटकाचा लाभ घेऊ शकतात याची माहिती दिली यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ज करण्याची आव्हान करण्यात आले. त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक प्रकल्पामध्ये शेतीचा ओळख क्रमांक कसा फायद्याचा राहील याची माहिती दिली. या सर्व विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील सरपंच बाबासाहेब पाटील सवडे, गावातील प्रतिष्ठित शेतकरी पंडित सवडे, रमेश सवडे माजी सरपंच, समाधान सवडे,अंबादास सवडे,दिलीप सवडे,कारभारी सवडे, विलास सवडे,संतोष सवडे,सुरेश सवडे,सदाशिव सवडे,वामन सवडे, पंढरीनाथ म्हस्के मनसे सरचिटणीस तालुका जाफ्राबाद,व गावातील सर्व शेतकरी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment