पीएम श्री केंद्रीय विद्यालय आ. नि. वरणगांव येथे भारतीय भाषा उन्हाळी शिबीर
तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : पीएम श्री केंद्रीय विद्यालय आ. नि. वरणगांव येथे २६ मे ते २ जून २०२५ या कालावधीत भारतीय भाषा समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२६) या समर कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा व त्याचे महत्व पटवून देण्यात आले. सात दिवसीय या कॅम्प मध्ये विविध प्रतियोगिता,कार्यक्रम ठेवण्यात आले . आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये भरभरून सहभाग घेतला. या शिबिराच्या अंतर्गत भारतातील कन्नड, गुजराती, तेलगु, राजस्थानी इत्यादी भाषांवर आधारित कला नृत्य कहाणी मुलांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध भाषेत बोलण्याचा आनंद घेतला. या अगोदर केवळ मुलांना हिंदी किंवा इंग्रजीत भाषेत बोलावे लागत असे. पण यंदा विविध भारतीय भाषांत त्यांना त्यांचे म्हणणे मांडता आले. या भाषेतून मुलांनी आपले म्हणणे मांडले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी फ्लॅश कार्ड, स्लोगन, हस्ताक्षर आणि स्व. परिचय आदी उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विविध राज्याचा पोशाख परिधान करून राज्याची व मातृभाषेची ओळख करुन दिली. या कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्या रागिनी गजभिये यांनी केले. या शिबिराच्या मध्यमातुन विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि भाषिक विविधता जाणून घेण्याची आणि समजून येण्याची संधी मिळते. आपल्या भाषा ही आपली सांस्कृतिक संपती आहे जी शिकण्याची आणि जतन करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आवड वाढवण्यासाठी आणि भाषांचा वारसा जपण्याच्या दिशेने हे उन्हाळी शिविर एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
No comments:
Post a Comment