न्याय देता की जीव घेता
▪️आमरण उपोषणाचे 31 वे दिवस असूनही शासन प्रशासनाला जाग नाही
▪️उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर
▪️दोषींना वाचविण्याचे पोलीस प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न
प्रविण भोंदे
भंडारा : जिल्ह्यातील मौजा पिटेसुर (आलेसुर) येथे दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी तपीस दिनदयाल घरडे च्या घातपातातील संशयित आरोपींना तत्काळ अटक करुन उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्या संदर्भात मृतक तपीस चे आई वडील मागील 31 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली असून त्यांच्या जिवास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तपीस घरडे च्या घातपातास सात महिन्याच्या कालावधी लोटूनही अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडून संशयित आरोपींना पकडण्यात आले नसल्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून दि. 07 एप्रिल 2025 रोजी पासून मृतक तपीस चे आई वडील जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आमरण उपोषणाचे 31 वे दिवस असून सुद्धा या प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे.
दिनदयाल नामदेव घरडे मौजा पिटेसुर (आलेसुर), ता. तुमसर, जि. भंडारा यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार दि. 27/09/2024 रोजी तपीस दिनदयाल घरडे वय 20 वर्षे याची हत्या इंदुताई मेमोरियल हायस्कूल पिटेसुर च्या लगत असलेल्या शेतातील बांधीत नियोजनबद्ध रीत्या करुन त्याच्या पायाला इलेक्ट्रीक तार गुंडाळून ठेवले अशी शंका मृतक तपीस च्या आई वडीलांची आहे. मृतक तपीस च्या आई-वडिलांच्या तक्रारीनुसार तपीस चा मृत्यू हा विजेच्या शॉक ने झाला नसून तक्रारीत नमूद संशयित व्यक्तींकडून घातपात झाला असल्याचे संशय व्यक्त केले आहे.
तपीसचे आई-वडील आंधळगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्याकरीता गेले असता तेथील ठाणेदारांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करुन शवविच्छेदन केलेला मृतदेह जाळण्याच्या दबाव घालण्यात आला असल्यामुळे तपीस चे मृतदेह जाळण्यात आले. तपीशचे आई वडील वेळोवेळी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्याकरीता गेले असता तेथील ठाणेदारांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतलीनाही. त्यामुळे ठानेदार यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून आरोपींना वाचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तपीस च्या आई वडीलांच्या संशयानुसार गावातील एका मुलीशी तपीस चे मैत्रीचे संबंध होते. दररोज तपीसचे बोलने त्या मुलीशी व्हायचे. हि बाब मुलीच्या घरच्यांना खटकत असल्यामुळे त्यांनी तपीसचा काटा काढण्याची योजना आखली असावी व घटनेच्या दिवसी पुर्वनियोजीत कट रचून तपीस ची हत्या करण्यात आली असावी व त्याचे मृत शरीर शेजारच्या शेतात नेऊन त्याच्या पायाला तार गुंडाळून ठेवले असावे.
तपीस च्या आई वडिलांनी तपीसच्या मैत्रीनीचे वडील व गावातील त्यांच्या ईतर तिन सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला असुन तशी तक्रार पोलीस अधीक्षक यांना सुद्धा दिलेली आहे तरीसुद्धा संशयित आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक केली नाही. उलट संशयित आरोपी हे तपीस च्या आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी आणि गलीच्छ शिविगाळ करुण मानसिक त्रास देत आहेत.
मागण्या :
i) संशयित आरोपींना अटक करून त्यांची कसून चौकशी करण्यात यावी.
ii) इंदूताई मेमोरियल हायस्कूल पिटेसुर च्या पटांगणातील घटनेवेळीचे/ पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे.
iii) मृतक तपीस, त्याची मैत्रीण पुनम व संशयित आरोपींच्या मोबाईलची तपासणी करण्यात यावी.
iv) संशयित आरोपींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
v) आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
vi) सदर घटनेचे पुरावे नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.
vii) आई-वडील तपीस च्या हत्येची तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता ती तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली व तक्रार नोंदवून घेतली नाही व आपल्या कर्तव्यात कसूर करून आरोपींना वाचविण्याच्या पूर्णपणे प्रयत्न केला. अशा आंधळगाव पो. स्टेशन च्या कर्तव्यकसुर ठानेदारास निलंबित करण्यात यावे.
vii) एकुलता एक मुलगा हिरावून गेल्यामुळे पीडित कुटुंबास ₹ 50 लाख (रुपये पन्नास लाख) रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी व पिडीत कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्यात यावी.
viii) मृतक तपीस ला न्याय मिळावा म्हणून 15 दिवसापासून उपोषणास बसलेल्या मृतक तपीस च्या आई बाबांना काही कमी जास्त झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी शासन प्रशासनाची असेल.
▪️सदर हत्ये प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी व गुन्हेगारांना अटक करुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व उपोषण कर्त्या आई वडीलांना न्याय देण्यात यावा संदर्भात केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली च्या वतीने संगठनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांनी जिल्हाधिकारी भंडारा, पुलीस अधिक्षक भंडारा, अनुसूचित जाती आयोग पुणे यांना वेळोवळी निवेदन व स्मरणपत्र दिले परंतु सदर प्रकरणी शासन-प्रशासन अनास्था दाखवित आहेत. न्याया करीता आममरण उषोषनावर बसलेल्या आई वडीलांना संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते महेंद्र तिरपूडे, जयेंद्र देशपांडे, नाशिक चवरे, प्रविण भोंदे, महेंद्र देशपांडे, प्रियदर्शन सोनटक्के यांनी समर्थन करुन न्याय मिळेपर्यंत लढा देणार आहेत. त्यासोबतच भिम आर्मी संघटना भंडारा ने सुद्धा सदर आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
No comments:
Post a Comment