वादळी पावसात वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद..! शिरूरच्या मलठण परिसरात विजेचा खांब पडल्यावरही वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत..!

 



पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 

शिरूर तालुक्यातील मलठण परिसरात सोमवारी (ता. २६) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आणि विद्युत तारा तुटून परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. अशा प्रतिकूल हवामानातही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली.

या आपत्तीची माहिती मिळताच शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव आणि सहाय्यक अभियंता राजेंद्र इंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुसळधार पावसातच वीज दुरुस्तीचे काम सुरू केले.

पावसामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य, वाऱ्यामुळे उडणारी धूळ आणि अंधाराचे सावट असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर अथक प्रयत्न करून नव्याने वीज खांब उभारले आणि विद्युत तारा जोडून संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केला.

या कठीण आणि धोकादायक कामात चक्रधार जाधव, इंद्रजित खरसाडे, आबा पवार, उमेर शेख, आशिष साठे, चांगदेव थोरात, राहुल नरे, प्रशांत मिटगोळे, कैलास गायकवाड, निलेश गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत असून, त्यांच्या या तत्पर आणि निष्कलंक सेवेबद्दल नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या संपूर्ण घटनाक्रमातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा, सेवाभाव आणि संकटाशी झुंज देण्याची वृत्ती समाजापुढे आदर्श ठरावी अशीच आहे.

वादळी पावसातही महावितरणचा ‘वीजपुरवठा’ अविरत! – एक कर्तव्यदक्षतेचा उत्तम नमुना..!


No comments:

Post a Comment